महाराष्ट्रातील ५० गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता ; ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

0
151

मुंबई (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन

राज्यातील निवडक ५० गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

या बाबतीत १८ जानेवारी २०२३  रोजी बैठक पार पडली होती. या अनुषंगाने सदर बैठकीत या बाबतीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सदर ५० गावाच्या प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते.  या अनुषंगाने ग्राम विकास विभागाच्या वतीने  दि. 24 मे रोजी याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले असून, यामध्ये  जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, जालना, नंदुरबार पुणे, नांदेड, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, अमरावती, नागपूर, आदी जिल्ह्यांतील गावांची निवड करण्यात आली असून, लवकरच बांधकाम करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती ही या वेळी श्री.महाजन यांनी दिली.

सभागृह बांधण्यात येणारी गावे पुढीलप्रमाणे आहेत.
पहूरपेठ, वाकोद, पहुरकसबे, ता.जामनेर, लोहारा, कुऱ्हाड, ता.पाचोरा,  म्हसावद, ता.जळगाव, अहिरवाडी, ता.रावेर, शिरसाला, ता.बोदवड, चहार्डी, ता.चोपडा, पाळधी, ता.धरणगाव, निमगाव घाना, ता,अहमदनगर, मोहरी, ता.पाथर्डी, आस्तेगाव, ता.राहता, मुकिंदपूर, ता.नेवासा, पट्टनकोडोली, ता.हातकंणगले, अदमापूर, ता.भुदरगड (गारगोटी), वाशी, ता.करवीर, घाणेवाडी, ता.जालना, टेंभुर्णी, ता.जाफराबाद, चिंचोली निपाणी, ता.भोकरदन, आनंदगाव, ता.परतुर, म्हसावद, ता.शहादा, नागरे, ता.पुरंदर, जाडकरवाडी, ता.आंबेगाव, माळेगांव, रीसनगांव, ता.लोहा, शेळगाव (छत्री), ता.नायगाव (खै), वझरगा, ता.देगलूर, नरसी, ता.नायगांव, पोफळी, ता.उमरखेड, मंगलादेवी, ता.नेर, चिखलगाव, ता.वणी, धनगरवाडी, ता.दारव्हा, मारवाडी बु. ता.पुसद, भरणे, ता.खेड, कांबळेश्वर, ता.फलटण, टाकेवाडी, ता.माण, वाठार स्टेशन, ता.कोरेगाव, तरंदल (धनगरवाडी), ता.कणकवली, खेडी, ता.सावली, बेम्बाळ, ता.मूल, थुतरा, ता.कोरपना, तेमुर्डा, ता.वरोरा, भंगाराम तळोधी, ता.गोडपिंपरी, नवरगाव, ता.सिंदेवाही, वाठोडा शुक्लेश्वर, ता.भातकुली, घोराड, ता.कळमेश्वर, रोहणा- इंदरवाडा, ता.नरखेड, बेला, ता.उमरेड, केळवद, ता.सावनेर
यामध्ये प्रामुख्याने वरील प्रमाणे ५० गावांचा समावेश आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहासाठी निवडण्यात आलेल्या गावातील ग्रामपंचायतींच्या वतीने सभागृह बांधण्यासाठी जागेची उपलब्धता करून देण्यात देण्यात येणार असून, सर्व सोयी- सुविधायुक्त सुसज्ज असे ५० सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहेत. या माध्यमातून धनगर तसेच भटके विमुक्त जाती जमाती व ओबीसी जमातीच्या लोकांसाठी या सभागृहातच्या माध्यमातून सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यक्रम या सभागृहात आयोजित करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याची माहिती मा. खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिली आहे. त्यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख धनगर समाज संघर्ष समिती रामेश्वर भाऊ पाटील पहूर ता जामनेर, प्रदेशाध्यक्ष आनंद बनसोडे आदी उपस्थित होते.