Home मनोरंजन jaya bachchan amitabh bachchan relationship: जेव्हा अमिताभ बच्चन सर्वांसमोर जया यांच्यावर खूप भडकले, बऱ्याचदा महिलांना या समस्येचा करावा लागतो सामना

jaya bachchan amitabh bachchan relationship: जेव्हा अमिताभ बच्चन सर्वांसमोर जया यांच्यावर खूप भडकले, बऱ्याचदा महिलांना या समस्येचा करावा लागतो सामना

0

[ad_1]

लग्नानंतर एखाद्या महिलेच्या आयुष्यात जितक्या वेगाने बदल घडतात, तुलनेनं पुरुषांचे जीवन तितकेसे बदलत नाही; ही बाब नाकारता येणे शक्य नव्हे. भारतीय समाजात विवाहित महिलेकडून सासरच्या मंडळींपासून ते नवऱ्यापर्यंत, सर्वांच्याच ढीगभर अपेक्षा असतात. बर्‍याचदा या लोकांच्या अपेक्षेनुसार गोष्टी न झाल्यास महिलांना सर्वांसमोर कित्येक टोमणे ऐकावे लागतात. लग्नानंतर पती आपल्या पत्नीवर अशा पद्धतीने अधिकार गाजवतात की आपण कुठेही कधीही काहीही पत्नीला ऐकवू शकतो, असे त्यांना वाटते.

बदलत्या काळानुसार आता महिला अशा पद्धतीच्या वाईट वागणुकीविरोधात आपला आवाज उठवतात. पण तरीही बर्‍याच ठिकाणी विवाहित महिलांना आपल्या पतीचा राग सहन करावा लागतो. ज्यामुळे ती स्वतःला कमी लेखू लागते आणि यामुळे तिला प्रचंड त्रास देखील होतो. असाच एक किस्सा बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या घरामध्ये घडला होता, जेव्हा जेवताना त्यांनी पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यावर राग काढला होता. (फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स)

​डायनिंग टेबलवर जया यांच्यावर भडकले होते बिग बी

पत्रकार करण थापर यांनी आपले पुस्तक ‘Devil’s Advocate: The Untold Story’ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या मुलाखतीचा संदर्भ देत घडलेला पूर्ण किस्सा सांगितला होता. बिग बींच्या मुलाखतीदरम्यान त्यांना विवाहबाह्य संबंधाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते, अशी माहिती पत्रकाराने आपल्या पुस्तकात नमूद केली आहे.

यानंतर डायनिंग टेबलवर अमिताभ यांचा संताप पाहायला मिळाला. पत्रकाराने सांगितले होते की, जया बच्चन यांनी अमिताभ यांना जेवणाच्या ताटात भात वाढू का असे विचारले होते. त्यावेळेस बिग बी भडकले आणि म्हणाले की, ‘मी जे खात नाही, तेच तू मला खायला का देत आहेस?’ यावर जया यांनी उत्तर दिले, ‘मी तुम्हाला भात यासाठी देत आहे, कारण पोळ्या अजून तयार झालेल्या नाहीत’.

(दिलीप कुमार-सायरा यांच्या आयुष्यात मूल का नव्हते? अभिनेत्याशी संबंधित गोष्टी शिकवतात की नेमकं कसं असतं खरं प्रेम)

​’तुला काय अडचण आहे?’

पुस्तकात छापण्यात आलेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांनी पुढे म्हटलं की, ‘ मी भात खात नाही, हे तुला माहिती आहे. पोळ्यांबाबत मी तक्रार करत नाहीय’. त्यावेळेस जया यांनी त्यांना समजावून सांगितले की, ‘डायनिंग टेबलवर पोळ्या येण्यास इतका वेळ का लागत आहे, हे मी पाहते. तोपर्यंत आपण थोडासा भात खाऊन घ्या’. यावर अमिताभ यांनी रागात उत्तर देत म्हटलं की, ‘जरा थांब, मी पोळ्यांच्या प्रतीक्षेत आनंदात आहे. मला भात नकोय, हे तुला का कळत नाहीय? तुला नेमका काय त्रास आहे? मी काय सांगतोय हे तुला ऐकू येत नाही का? पत्रकाराच्या पुस्तकातील माहितीनुसार एवढे सगळं ऐकल्यानंतर जया तेथून निघून गेल्या.

दरम्यान डायनिंग टेबलवर पतीच्या रागाचा सामना करणाऱ्या जया बच्चन या एकमेव महिला नाहीत, तर कित्येक महिलांच्या आयुष्यात अशा गोष्टी घडत असतात. ज्यांना सर्वांसमोर कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे आपल्या पतीच्या रागाचा सामना करावा लागतो. आपल्या मनामध्ये या वेदना लपवून त्या शांतपणे सर्व काही सहन करतात.

(‘रणबीरसारखे लोक मी आजपर्यंत पाहिले नाहीत’ असं का म्हणाली आलिया भट, जीवनात नेमके बदललेय तरी काय?)

​पती कुठेही पत्नीवर काढतो राग

डायनिंग टेबल असो किंवा एखाद्या मित्राची पार्टी, पती बहुतांश वेळा पत्नीला स्वयंपाक तयार करणे, ड्रेसिंग सेन्स आणि ड्रायव्हिंग यासारख्या गोष्टींवरून टोमणे मारण्याची संधी सोडत नाहीत. आपल्या मित्रांसमोर सुद्धा आवाज वाढवून ही मंडळी आपल्या पत्नीवर राग काढतात. उदाहरणार्थ ‘तू एक काम नीट करू शकत नाहीस?’, ‘तुला थोडीशीही शिस्त नाहीय का?’, ‘मित्रांसमोर माझा अपमान केलास?’ यासारख्या बर्‍याच गोष्टी ऐकवण्याचा आपल्याला हक्क आहे, असा त्यांचा गैरसमज असतो. पण दुसऱ्या लोकांसमोर आपल्या पत्नीवर टीका करण्याचा कोणताही अधिकार तुम्हाला नाही.

तुमच्या अशा वागण्यामुळे आपण पत्नीच्या भावना दुखावत आहात, हे लक्षात घ्यावे. जर ती तुमच्या मित्रांसाठी जेवण तयार करत असेल तर ही तिची जबाबदारी नाही तर तिचे तुमच्यावरचे प्रेम आहे. या मोबदल्यात तुम्ही तिचे कौतुक केले पाहिजे आणि घरातील कामांमध्ये तिला मदत करणे ही तुमची देखील जबाबदारी आहे.

(‘आनंदमध्ये दिसते माझीच छबी’, मुकेश अंबानींकडून जावयाचं कौतुक, वडिलांना मुलीसाठी हवा असतो असाच पती)

​स्वयंपाकावरून टोमणे मारणे योग्य नव्हे

भारतीय समाजात जेवण तयार करण्याची आणि ताटामध्ये जेवण वाढण्याची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. महिलांसाठी हे मापदंड आधीपासून ठरवण्यात आलेले आहेत, जेथे स्वयंपाक तयार करणे आणि पतीच्या आवडीचे काहीही न केल्यास पत्नीची निंदा करणं सामान्य बाब मानली जाते.

जर तुम्हाला स्वयंपाक येत नसेल किंवा तुम्ही स्वतःच्या हाताने पतीला जेवण वाढत नसाल तर तुम्ही एक उत्तम पत्नी नाही, याची जाणीव आपल्याला पदोपदी करून दिली जाते. दरम्यान पुरुषांना हे समजायला हवे की जेवण स्वतःहून वाढून घेणे आणि वरण-भात- पोळी यासारखे सोपे पदार्थ त्यांना तयार करता येणे देखील गरजेचं आहे. स्वयंपाक तयार करणे, जेवण वाढणे, ही जबाबदारी केवळ पत्नीचीच नाहीय.

(जेव्हा आमिरने किरणचं केलं तोंडभर कौतुक, असा जोडीदार मिळाल्यानंतरही जोडपी का होतात विभक्त?)

​राग नियंत्रणात ठेवणे गरजेचं

विवाहित जोडप्याने प्रेमाव्यतिरिक्त एकमेकांचा आदर करणे देखील महत्त्वाचे आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांना जास्त राग येत असल्याचं आढळते आणि भारतीय समाजात पती आपला राग पत्नीवर काढणे म्हणजे त्याचा अधिकार असल्याचेच मानतो. परिणामी बहुतांश लोक एकत्रित राहतात, पण त्यांच्या नात्याचा पाया कमकुवत झालेला असतो.

जेव्हा आपण आपल्या पत्नीला एक काम करणारे यंत्र आणि घर सांभाळणारी याच दृष्टीकोनातून पाहता, तेव्हा तिचे आणि तुमचे संबंध केवळ नावापुरतेच मर्यादित असतात. सतत पत्नीचा अपमान करून तुम्ही तिचा स्वाभिमान दुखावता. यामुळे तिचे तुमच्यावरील प्रेम देखील कमी-कमी होत जाते.

हे नुकसान टाळण्यासाठी जेव्हा-जेव्हा आपल्याला राग येईल, तेव्हा थोडा वेळ शांत राहा आणि गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करा. त्यानंतरच प्रतिक्रिया द्यायची की नाही ते ठरवा. पत्नी म्हणजे एखादी वस्तू नव्हे, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. तिला सुद्धा पूर्ण आदर मिळाला पाहिजे. कोणत्याही कारणामुळे आपण आपल्या पत्नीवर राग काढू शकत नाही, अन्यथा तुमच्या वैवाहिक जीवनात तणावासह कटुता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

(‘संसार मांडायचा नव्हता’ साखरपुड्यानंतर या हॉट अभिनेत्रीचं नातं मोडलं, काय होतं कारण)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here