Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र शिवबंधन तोडत धैयशील कदमांनी हाती घेतले कमळ…

शिवबंधन तोडत धैयशील कदमांनी हाती घेतले कमळ…

0
शिवबंधन तोडत धैयशील कदमांनी हाती घेतले कमळ…

औंध | शासननामा न्यूज ऑनलाईन

कऱ्हाड उत्तरचे शिवसेनेचे नेते आणि वर्धन ॲग्रोचे अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी काल मुंबईत शिवबंधन तोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राहुल कुल यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, कऱ्हाड उत्तरमधील विकासकामांना गती देऊन धैर्यशील कदम यांना ताकद देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली.

श्री. कदम यांनी २०१९ मध्ये शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवली होती. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे मतदारसंघाच्या विकासकामांना निधी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, माजी सहकारमंत्री यांच्या दबावामुळे शिवसेनेने त्यांना वाऱ्यावर सोडले. विकासकामांच्या अनेक फाईल बाजूला टाकल्या.

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता शिवबंधन तोडून श्री. कदम यांनी अखेर आज मुंबई येथे भाजप कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, रहिमतपूर नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते नीलेश माने यांच्यासह मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here