पुणे, 07 जून : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वाक्य युद्ध पेटण्याचे चिन्ह आहे. ‘नाथाभाऊ हे आजही नेते आहेत. निदान तिकडे गेल्यावर तरी त्यांनी खरं बोलायला पाहिजे, आम्हाला धोका झाला याचे दु:ख आहे, पण पक्षात कोणतीही अस्वस्थता नाही’, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी खडसेंना टोला लगावला.
पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या आरोपांना उत्तरं दिली.
एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले. पण, नाथाभाऊ आजही आमचे नेते आहेत. तिकडे गेल्यावर खरं बोलायला पाहिजे. राष्ट्रवादीत गेल्यापासून त्यांनी एकही आंदोलन केलं नाही. आम्ही अनेक आंदोलनं केली. पंढरपूर पोटनिवडणूक सुद्धा जिंकलो. पण आम्हाला धोका झाला याचं दुःख आहेच, पण ही प्रतिक्रिया आहे. पक्षात कुणीही अस्वस्थ नाही, असंही पाटील यांनी सांगितलं.
[…] निदान तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं, च… […]
[…] निदान तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं, च… […]
[…] निदान तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं, च… […]