महाराष्ट्र सरकारी योजना 2023 | Maharashtra Sarkari Yojana 2023

11
347

राज्यातील गरीब आणि वंचित मागासवर्गीय नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करून त्यांच्या जीवनात स्थिरता निर्माण केल्या जाते, तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. वाचक मित्रहो, आपण या लेखात महाराष्ट्र शासनच्या या विविध योजनांच्या संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत, आपल्यासाठी हि माहिती अत्यंत उपयुक्त ठरू शकते, यासाठी हा लेख संपूर्ण वाचावा. 

माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 इथे क्लिक करा

महाराष्ट्र सरकार राज्याच्या नागरिकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना आणि सेवा राबवीत असते, याच धोरणाला अनुसरून राज्यातील मुलींसाठी राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु केली, या योजनेच्या माध्यामतून महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण व आरोग्य यांच्या मध्ये सुधारणा करणे मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था करणे, याचबरोबर समाजामध्ये मुलींच्या जन्मा विषयीचे नकारत्मक विचारांमध्ये सुधारणा करून मुलींच्या विषयी सकारात्मक विचार निर्माण करणे तसेच बाल विवाह रोखणे आणि मुला इतकाच मुलींचा जन्म दर वाढविणे हा उद्देश समोर ठेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यात सुकन्या योजनेचे लाभ कायम ठेऊन माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित हि योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून सुरु करण्यात आली. माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित 2022, या योजने संबंधित संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ऑनलाइन अर्ज PDF इथे क्लिक करा

अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे बहुतांश 

वेळा या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण घेण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, या सर्व विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी हि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2022 सुरु केली आहे, जेणेकरून या विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण अबाधित पूर्ण करता यावे. शासनच्या स्वाधार योजना 2022, या योजने संबंधित संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी 

श्रावण बाळ योजना 2023 महाराष्ट्र इथे क्लिक करा

महाराज्यातील 65 आणि 65 वर्षाच्या वरील जेष्ठ नागरीकांसाठी त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हि श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरु केली आहे, महाराष्ट्र सरकारव्दारे नेहमीच राज्याच्या नागरिकांसाठी कल्याणकारी आणि लोक उपयोगी योजना राबविल्या जातात, या योजनांव्दारे समाजातील कमी उत्पन्न असलेले, वंचित नागरिक, आर्थिक दुर्बल घटक त्याचबरोर निराधार जेष्ठ नागरिक आणि सामान्य गरीब नागरिक यांचे जीवनमान सुधारणे त्यांना आर्थिक सुरक्षा देणे तसेच त्यांना आरोग्यविषयक सुविधा निर्माण करून देणे आणि त्यांना समाजात मानाने जीवन जगण्यास पाठबळ देणे हा उद्देश शासनाचा असतो, त्याप्रमाणे या श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार दरमहा 600/- रुपये जेष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ निवृत्तीवेतन देत आहे.

रमाई आवास योजना 2023 ऑनलाइन अर्ज इथे क्लिक करा

महाराष्ट्र सरकारव्दारा जनकल्याणासाठी आणि राज्यातील आर्थिक दुर्बल, वंचित आणि गरीब सामान्य नागरिकांसाठी लोक उपयोगी व कल्याणकारी योजना राबविल्या जातात, रमाई घरकुल योजना 2022 हि एक अत्यंत महत्वाची आणि महत्वाकांक्षी राज्य पुरस्कृत योजना आहे, देशामध्ये मोठयाप्रमाणात नागरिक  दारिद्र्यरेषेखाली जीवनयापन करतात हे नागरिक साधारतः कमी उत्पन्न गटातील असतात, त्यामुळे त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंची कमतरता असते त्याचबरोबर कमी उत्पन्न असल्यामुळे त्यांच्याकडे निवाऱ्याची सुद्धा व्यवस्था नसते. कमी उत्पन्न असल्यामुळे हे नागरिक स्वतःची जागा घेऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीत या नागरिकांना कच्च्ये मकान किंवा झोपडी अशा प्रकारची निवाऱ्याची व्यवस्था करावी लागते. 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 इथे क्लिक करा

महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना, धोरणे नियोजनबद्ध पद्धतीने राबवीत असते, याच धोरणाचा अवलंब करून शेततळे योजना, सौर कृषी पंप योजना या सारख्या योजना शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या योजनांची अंमलबजावणी करत आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप आस्थापित करण्याची योजना जाहीर केली आहे, सौर उर्जा हा उर्जेचा शाश्वत आणि अखंड स्त्रोत आहे, भारतासारख्या देशामध्ये आठ महिने कडक उन असते, त्यामुळे निसर्गाकडून मिळालेल्या या निरंतर उर्जेच्या स्त्रोताचा वापर सौर कृषी पंपच्या माध्यमातून वापरून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो. महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी योजना 2022 संबंधित माहिती मिळविण्यासाठी 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) 2023 इथे क्लिक करा

राज्य सरकार राज्यातील बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या योजना राबवून तरुणांना आर्थिक सहाय्य करण्याचा प्रयत्न करत असते, राज्यातील तरुणांनी नोकरी शोधण्यापेक्षा उद्योग, व्यवसायांकडे यावे व स्वतःचे उद्योग उभे करून स्वावलंबी व्हावे, त्याचबरोबर उद्योग उभे करून रोजगार निर्माण करावा. यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राज्यातील नागरिकांसाठी सुरु केली आहे ती आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम 2022 (CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम संबंधित अधिक माहितीसाठी 

मागेल त्याला शेततळे योजना 2023 इथे क्लिक करा

शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती करतांना नेहमी पाणी टंचाईला समोर जावे लागते, या सर्व कारणांमुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते, शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ करून सात्यत्तता आणण्यासाठी आणि सततच्या पाणी टंचाईवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी शेततळे हे अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचे असल्याने राज्यातील पावसावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व स्थायी सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला शेततळे योजना सुरु केली आहे. मागेल त्याला शेततळे योजना मराठी 2023 संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी 

महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र 2023 इथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्यात मोठ्याप्रमाणात सुशिक्षित बेरोजगार असलेले तरुण आहेत, जे रोजगाराच्या शोधात असतात परंतु त्यांना रोजगार शोधण्यात अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतो, या सर्व बेरोजगार तरुणांच्या अडचणी व समस्या विचारात घेऊन राज्य शासनाने महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून राज्य सरकार राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करून देणार आहे, या माध्यमातून बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा शासनाचा उद्देश आहे. महाराष्ट्र महास्वयम रोजगार नोंदणी पोर्टल संबंधित अधिक माहित मिळविण्यासाठी 

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना 2023 इथे क्लिक करा

अजूनही स्त्रिया निर्धन आणि निरक्षर असण्याचे मोठे प्रमाण आहे, विशेषत ग्रामीण ग्रामीणभागात हे प्रमाण जास्त प्रमाणात आहे तसेच ग्रामीण भागांमध्ये अजूनही महिला स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही, स्त्रियांची निर्णय क्षमता वाढविणे आवश्यक आहे. भारतीय घटनेने स्त्रियांना अनेक अधिकार दिलेले आहे. महाराष्ट्र शासन नेहमीच जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबवीत असते, हा सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून महाराष्ट्र शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच विविध मार्गाने त्यांची मदत करत असते, ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांचे सशक्तिकरण करण्याच्या उद्देशाने शासनाने महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना 2022 राज्यामध्ये राबविण्याचे ठरविले आहे. या योजनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी 

महाराष्ट्र शिवभोजन योजना 2023 माहिती इथे क्लिक करा

ग्रामीण भागातील गरीब लोकांना, विद्यार्थ्यांना कामाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते, शहरात आल्यानंतर या लोकांना स्वस्त दरात जेवण कोठे मिळेल याचा शोध घ्यावा लागतो, त्यामुळे या सर्व नागरिकांची गरज ओळखून त्यांच्या समस्येचे निवारण करण्याच्या उद्देशाने तसेच या नागरिकांना एकवेळचे पोटभर जेवण मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने शिव भोजन योजनेची सुरुवात केली आहे. शासनाच्या या महत्वपूर्ण योजनेमुळे समाजातील गरीब आणि कष्टकरी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिव भोजन योजना अंतर्गत 10/- रुपये प्रती थाळी याप्रमाणे भोजन उपलब्ध करून देण्यात येईल. शिव भोजना योजना संबंधित माहिती मिळवण्यासाठी 

महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडीट सोसायटी डिपॉजिट प्रोटेक्शन स्कीम 2022 इथे क्लिक करा

सहकारी पतसंस्थांचा राज्याच्या अर्थ व्यवस्थेत मोठा असतो, महाराष्ट्र राज्यात सुमारे 9000 च्या जवळपास पतसंस्था आहेत या पतसंस्था सर्व राज्यात, ग्रामीण भागात तसेच शहरीभागात पसरलेले आहे या पतसंस्था सूक्ष्म वित्त संस्था म्हणून काम करत असतात. पतसंस्थांचा ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात अर्थव्यवसाय असतो त्याचप्रमाणे शहरी भागातसुद्धा या सहकारी पतसंस्थांचा मोठा अर्थव्यवसाय असतो. या पतसंस्था छोटे व्यावसायिक, किराणा दुकानदार, मजूर, तसेच निन्म मध्यमवर्गीय यांना वित्तीय सेवा देत असतात. पंडित दीनदयाल उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पंडित दीनदयाल उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजना, अधिक माहिती मिळविण्यासाठी 

महाराष्ट्र कन्या वन समृद्धी योजना 2023 इथे क्लिक करा

जंगलांचे, वनांचे महत्व जागितक स्तरावर सर्वानीच ओळखले आहे. संपूर्ण जगामध्ये काही देश असे आहे ज्यांची ओळख त्यांच्या देशामध्ये असलेल्या समृध्द वनांमुळे सर्व जगाला झाली आहे, पर्यावरण संरक्षणासाठी भौगोलिकदृष्ट्या 33 टक्के क्षेत्र वनाखाली असणे अत्यंत आवश्यक असते, महाराष्ट्र राज्यात जवळपास 20 टक्केच क्षेत्र वनाखाली आहे. या अत्यंत महत्वाच्या बाबींचा विचार करून शासनाने या कन्या वन समृद्धी योजनेची सुरुवात केली आहे. महाराष्ट्र कन्या वन समृद्धी योजना संबंधित अधिक माहिती घेण्यासाठी 

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2023 इथे क्लिक करा

कधी अतिवृष्टीमुळे त्यांच्या पिकांचे नुकसान होते तर कधी शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या पिकांचे नुकसान होते या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी हैराण होतो, या सततच्या नुकसानामुळे आणि त्यांच्या पिकांना योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना नेहमी कर्ज काढावे लागते, या सर्व बाबींमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी व कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी  कर्जमुक्ती योजना सुरु केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजने संबंधित माहिती मिळविण्यासाठी 

महाजॉब्स पोर्टल 2023 महाराष्ट्र माहिती इथे क्लिक करा

ग्रामीण तसेच शहरी भागांमधील कुशल किंवा अर्धकुशल कामगारांना त्यांच्या कौशल्या प्रमाणे रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध आहे या बद्दल  माहिती नसते तसेच व्यावसायिकांना सुद्धा या समस्यांना समोर जावे लागते, त्यांना सुद्धा त्यांच्या व्यवसायासाठी कौशल्यपूर्ण कामगार मिळत नाही, या सर्व समस्यांचा विचार करून आणि राज्यातील स्थानिक नागरिकांना रोजगार सहज उपलब्ध व्हावा, नागरिकांना रोजगार सुलभतेने शोधता यावा तसेच उद्योजकांना त्यांचा व्यवसायासाठी सुलभतेने कौशल्यपूर्ण कामगार उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनाने या महाजॉब्स पोर्टल 2022 ची सुरुवात केली आहे, महा जॉब्स पोर्टल संबंधित माहिती मिळविण्यासाठी 

महाDBT शिष्यवृत्ती 2023: मराठी, ऑनलाईन अर्ज, पात्रता इथे क्लिक करा

महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी हे पोर्टल सुरु केले आहे या पोर्टलच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी त्यांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि आवश्यक शिष्यवृत्त्या एकाच वेबपोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आल्या आहे, या महाDBT शिष्यवृत्ती मुळे राज्यातील आर्थिक कमकुवत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारा खर्च शिष्यवृत्तीच्या सहाय्याने आर्थिक मदत देऊन कमी करावा. महाdbt पोर्टल हे महाराष्ट्र शासनाचा एक मुख्य आणि महत्वपूर्ण उपक्रम आहे, या पोर्टलव्दारे सामान्य नागरिकांना योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने या पोर्टलची सुरुवात केली आहे. या योजने संबंधित अधिक माहिती मिळविण्यासाठी 

महा शरद पोर्टल 2023 इथे क्लिक करा 

राज्यात अनेक प्रकारचे दिव्यांग नागरिक आढळतात, अपंग, मूक बधीर, मानसिक आजाराने ग्रस्त या नागरिकांच्या सहाय्यतेसाठी राज्य सरकार विविध प्रकारच्या योजना राबवीत असते परंतु असे असंख्य दिव्यांग नागरिक असतात ज्यांच्या पर्यंत या योजनांची माहिती पोहचत नाही, त्यामुळे हे दिव्यांग नागरिक या योजनांचा लाभ मिळवू शकत नाही. या नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहचत नाही, या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने दिव्यांग नागरिकांसाठी एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे, महाराष्ट्र शासनाकडून या दिव्यांग नागरिकांसाठी महा शरद पोर्टल सुरु करण्यात आले आहे. महा शरद पोर्टल संबंधित संपूर्ण माहिती घेण्यासाठी

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023 इथे क्लिक करा

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हि महाराष्ट्र सरकारची मुख्य आणि महत्वाकांक्षी अशी आरोग्य योजना आहे, महाराष्ट्र शासनाने राज्यातील जनतेसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या आहेत, या योजना अत्यंत लोक उपयोगी असून राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील नागरिकांसाठी त्याचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना गरजेच्यावेळी आर्थिक मदत देऊन त्यांच्या जीवनात स्थेर्य निर्माण करण्याच काम या योजनांव्दारे शासन करत असते. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हि महाराष्ट्र या योजने संबंधित अधिक माहिती मिळविण्यासाठी

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना 2023 इथे क्लिक करा

देशातील किंवा राज्यातील रस्त्यावर वाढलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे शहरातील रस्त्यांवर असो अथवा महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागते, त्याचप्रमाणे या अपघातांमध्ये काही नागरिकांना कायमच्या अपंगत्वाला सामोरे जावे लागते, या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्वाची योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्याचे ठरविले आहे.या योजने संबंधित अधिक माहिती मिळविण्यासाठी

डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना 2023 इथे क्लिक करा

नागरिकांच्या गुणवंत विद्यार्थी मुलांसाठी ज्यांचा उद्देश पुढे शिकण्याचा आणि पुढे व्यावसायिक शक्षण घेऊन उच्च शिक्षित होण्याचा आणि आपले उच्च शिक्षणाचे स्वप्न करण्याचा उद्देश आहे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी त्यांचे शिक्षण अबाधित पूर्ण व्हावे त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करतांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शासनाव्दारे त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे ठरविले आहे त्यानुसार डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2022 राज्यामध्ये राबविण्यात आली आहे. या योजनेच्या संबंधित संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी

आम आदमी विमा योजना 2023 महिती मराठी ऑनलाइन अर्ज इथे क्लिक करा

असंघटित कामगारांची प्रमुख असुरक्षा म्हणजे आजारपण, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला नेहमी आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागते, असे बहुतांश कामगार सामाजिक सुरक्षा कवच नसलेले आहेत अशा असंघटित कामगार नागरिकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी तसेच त्यांचे सामाजिक जीवन सुधारण्यासाठी, उंचावण्यासाठी सरकारने आम आदमी विमा योजना राबविली आहे, आम आदमी विमा योजाना सरकारची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) व्दारे प्रशासित केली जाते. आम आदमी बिमा योजना अधिक माहिती घेण्यासाठी 

अस्मिता योजना 2022 इथे क्लिक करा

महाराष्ट्र सरकार वेळोवेळी समाजातील संपूर्ण घटकांचा सारखा विकास व्हावा म्हणून विविध प्रकारच्या लोक कल्याणकारी आणि अत्यंत उपयोगी अशा योजना राबवीत असते, या धोरणाचा अवलंब करून महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी आणि मुलींसाठी हि अस्मिता योजना 2022, 8 मार्च 2018 मध्ये सुरु केली आहे, अस्मिता योजना महाराष्ट्र 2022 अधिक माहिती मिळविण्यासाठी 

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2023 इथे क्लिक करा

महाराष्ट्र शासनाने शहरीभागातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांच्या निवासाच्या समस्येकडे लक्ष देऊन कामगारांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली, यामध्ये ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना समाविष्ट करण्यात आले नव्हते, परंतु केंद्र सरकारने जून 2015 मध्ये देशातील प्रत्येक कुटुंबांना राहण्यासाठी स्वतःचे हक्काचे घरकुल असावे या धोरणावर आधारित प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली. या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत (सक्रीय) ग्रामीण भागातील कामगारांसाठी अटल  बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) या योजनेस मंजुरी आणि अर्थ सहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी

Maharashtra Textile Units Online Registration Form 2023 इथे क्लिक करा

महाराष्ट्र सरकार राज्यातील उद्योगांसाठी आणि व्यवसायांसाठी राज्यात त्यांची प्रगती आणि उन्नती झाली पाहिजे या उद्देशाने नेहमी प्रयत्नशील असते, त्यामुळे शासनाकडून उद्योगांना विविध सुविधा पुरविल्या जातात या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने उद्योगांसाठी इलेक्ट्रिक पावर मध्ये सबसिडी देण्याचे ठरविले आहे, यासाठी महाराष्ट्र सरकारने या अधिकृत dirtexmah.gov.in वेबसाईटवर पावर अनुदानासाठी महाराष्ट्र टेक्स्टाईल युनिट्स ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म 2022 उपलब्ध करण्यात आले आहेत. या योजनेच्या संबंधित अधिक माहिती मिळविण्यासाठी 

Maharashtra Construction Workers Registration इथे क्लिक करा

बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार हा राज्यातील सर्वात मोठा असंघटित विभाग आहे, रोजगार आणि सेवेच्या शर्तीचे नियमन करण्यासाठी आणि याचप्रमाणे बांधकाम आणि इतर बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा व आरोग्य आणि कामगारांसाठी कल्याणकारी योजना व उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाना कडून महाराष्ट्र इमारत वइतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले, या कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत इमारत आणि इतर बांधकाम कामगार अशा प्रकारच्या कामांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबऊन तसेच विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांच्या अंतर्गत कामगारांना आरोग्य व शैक्षणिक तसेच आर्थिक लाभ देऊन कामगारांचे जीवनमान सुधारणे त्यांच्या जीवनाचा दर्जा उंमहाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे. या योजने संबंधित माहिती मिळविण्यासाठी

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना महाराष्ट्र 2023 संपूर्ण माहिती इथे क्लिक करा

भारत देश आधुनिक होत आहे देशामध्ये शासनाच्या धोरणांमुळे देश जलदगतीने विकसित होत आहे, भारतातून सर्वात जास्त औद्योगिकरण महाराष्ट्र राज्यात झालेले आहे त्यामुळे परदेशातून आणि देशांतर्गत मोठ्याप्रमाणात गंतवणूक महाराष्ट्रात येत आहे, तसेच वाढते आधुनिकीकरण आणि शहरीकरण यामुळे राज्यातील नागरिकांचे उत्पन्न वाढत आहे, वेगाने होत असलेले नागरीकरण आणि वाढते उत्पन्न यामुळे महाराष्ट्र राज्यात रिटेल उद्योगाच्या विकासाला मोठ्याप्रमाणात चालना मिळत आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत वेगाने होत असलेली प्रगती यामुळे उत्पन्नातील वाढीमुळे सुधारलेले जीवनमान आणि सध्याच्या कुटुंबव्यवस्थेत दुहेरी उत्पन्न असण्याकडे असलेला कल आणि तसेच लोकांच्या खाण्याच्या सवयींमध्ये होत असलेला बदल या सर्व बाबींमुळे महाराष्ट्र राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विकासाला मोठ्याप्रमाणात वाव आहे. या योजने संबंधित माहिती मिळविण्यासाठी

सुकन्या समृद्धी योजना 2023 इथे क्लिक करा 

प्रत्येक आई वडिलांना त्यांच्या मुलांची अत्यंत काळजी असते मुलांच्या संपूर्ण पालनपोषणाची जबाबदारी पालकांवरच असते, मुलांना चांगले उत्तम शिक्षण मिळावे, त्यांनी भविष्यात मोठी प्रगती करावी यासाठी सर्व पालक त्यांच्या कुवतीप्रमाणे प्रयत्न करीत असतात, पालकांना जशी मुलांच्या शिक्षणाची काळजी असते तशीच काळजी मुलांच्या लग्नाची सुद्धा असते कारण लग्नांमध्ये मोठ्याप्रमाणात खर्च होतो, गरीब पालकांना त्यांच्या मुलांचे पालनपोषण त्यांच्या कमकुवत आर्थिक परस्थितीमुळे योग्यरीतीने करता येत नाही तसेच त्यांना त्यांच्या मुला मुलींचे पालनपोषण करतांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे देशातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना तिच्या चांगल्या शिक्षणसाठी तसेच तिला तिच्या पायावर उभे करून स्वावलंबी बनविण्यासाठी आणि नंतर मुलगी सज्ञान झाल्यावर तिला तिच्या लग्नासाठी हक्काचे पैसे मिळावे, या संपूर्ण उद्देशाने केंद्र शासनाने सन 2015 पासून सुकन्या समृद्धी योजना 2022 या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरु केली आहे. या योजने संबंधित माहिती मिळविण्यासाठी

75 वर्षावरील जेष्ठ  नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत: महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण निर्णय  इथे क्लिक करा

महाराष्ट्र सरकारने जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे त्यामुळे राज्यातील जेष्ठ नागरिकां मध्ये आनंदाचे वातावरण आहे, महाराष्ट्र राज्यात या अगोदर जेष्ठ नागरिकांना प्रवासात पन्नास टक्के सूट दिली जात होती, परंतु आता शासनाच्या नियमानुसार वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. या सबंधित निर्णयाची योग्य रीतीने अंमलबजावणी करण्यासाठी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री शेखर चन्ने यांच्या माध्यमातून निर्देश देण्यात आले आहे. शासनच्या या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार पासून सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षे वयाच्या जेष्ठ नागरिकांना एसटी बसमधून विनामुल्य प्रवास शासनाच्या या योजनेचा फायदा जवळपास राज्यातील पंधरा लाख जेष्ठ नागरिकांना मिळणार आहे, एसटी महामंडळाच्या शिवनेरी या एसटी सेवें सह सर्व प्रकारच्या एसटी सेवांसाठी हि जेष्ठ नागरिकांची मोफत प्रवास योजना लागू असेल हि माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या योजने संबंधित माहिती मिळविण्यासाठी.

मुख्यमंत्री किसान योजना 2023 महाराष्ट्र  इथे क्लिक करा

मानवी जीवनात शेती हा अत्यंत महत्वाचा भाग आहे, भारतामधील नैसर्गिक किंवा प्रकृतीक हे वर्ष साला प्रमाणे बदलत नाही यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हवामान, जमीन आणि जमिनीची रचना आहे आहे, एखाद्या विशिष्ट भौगोलिक स्थितीत कोणते पिक येऊ शकेल हे पूर्णपणे या घटकांवर अवलंबून असते, पिक आणि शेतीचा प्रकार हे जमीन आणि जमिनीची रचना यावर अवलंबून असतात, आणि याला जर पर्जन्यमानाची साथ मिळाली तर त्यांचे परिणाम अधिक चांगले दिसतात, शेतकरी शेती हा व्यवसाय म्हणून करतात परंतू शेती हा व्यवसाय अनेक घटकांवर आधारित असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती कधी फायाद्ताची ठरते तर बहुतांश वेळा शेतकऱ्यांचे या अनेक घटकांमुळे शेतीत नुकसान होते. महाराष्ट्र सरकार नेहमीच राज्यातील नागरिकांच्या दृष्टीने व त्यांच्या हिताच्या द्र्ष्टीने विविध कार्यक्रम तसेच अनेक कल्याणकारी योजना राबवीत असते. या योजने संबंधित माहिती मिळविण्यासाठी.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2023 माहिती इथे क्लिक करा

राज्यातील सुशिक्षित तरुणांना त्यांच्या शैक्षणिक कौशल्याप्रमाणे रोजगार मिळाला नाही, तसेच बहुतांश तरुण ग्रामीण भागात सुशिक्षित असून सुद्धा रोजगार नसल्यामुळे गरिबीत जीवन जगत आहे, अशा तरुणांना त्यांच्या कडे आर्थिक व्यवस्था नसल्यामुळे असे तरुण स्वतःचा व्यवसाय करू शकत नाही, अनेकदा असे दिसून येते की बेरोजगार लोक अंमली पदार्थ आणि दारूचे व्यसन करतात किंवा आत्महत्येचा प्रयत्न करतात, ज्यामुळे देशाच्या मानव संसाधनाचे नुकसान होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने अशा तरुणांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने हि योजना सुरु केली आहे. युवकांना रोजगार मिळेपर्यंत हा बेरोजगार भत्ता दिला जाईल. महाराष्ट्र बेरोजगारी भत्त्याच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश्य आहे . या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांचे जीवनमान बदलणार आहे. हा पैसा तरुणांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी वापरता येईल. बेरोजगारी भत्ता महाराष्ट्राचे उद्दिष्ट राज्यातील बेरोजगार तरुणांना सक्षम बनवणे हा आहे. या योजने संबंधित माहिती मिळविण्यासाठी.

सोलर रूफटॉप सबसिडी योजना महाराष्ट्र 2023 इथे क्लिक करा 

महाराष्ट्र सरकार राज्यातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून तसेच विविध योजनांच्या माध्यामतून राज्यातील लोकांच्या रोजगारासाठी तसेच आरोग्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी कार्य करत असते यावेळी शासनाने, पारंपारिक पद्धतीने वीज निर्मिती अपुरी पडत असल्याने आणि विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने या समस्येवरचा उपाय आणि त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणासाठी, तसेच प्रचंड प्रमाणात उपलब्ध असेलेला शाश्वत स्त्रोत सौर उर्जेचा उपयोग, संपूर्ण जगभरात सौर उर्जेचा उपयोग होत आहे, शासनाने यासाठी हि सोलर रूफटॉप योजना तयार केली आहे, जगभरात कोळशाचा साठा संपत आहे तसेच त्यामुळे पर्यावरणाला नुकसान सुद्धा मोठ्याप्रमाणात होत आहे, आणि देशात विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे कारण आद्योगिक क्षेत्रात मोठ्याप्रमाणात प्रगती होत आहे तसेच पारंपारिक पद्धतीने वीज निर्मिती अपुरी पडत आहे त्यामुळे पुढे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला समोर जाण्यासाठी केंद्र शासनाने राज्यांच्या मदतीने हि योजना संपूर्ण देशात राबविणे सुरु केले आहे. या योजने संबंधित माहिती मिळविण्यासाठी.

(रजिस्ट्रेशन) म्हाडा लॉटरी 2023  इथे क्लिक करा

देशात औद्योगिकरणामुळे धीरे-धीरे शहरीकरण सुरु झाले त्यामुळे ग्रामीण भागातील जनता रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थालांतरित झाली, त्यामुळे त्यांना राहण्यासाठी घरे नसल्यामुळे झोपडपट्ट्या निर्माण झाल्या, घरांची टंचाई भासायला लागली त्यामुळे 1948 साली म्हाडा संस्था शासनाने निर्माण केली, 1948 साली स्थापन झालेल्या म्हाडा संस्थेचे उद्दिष्ट्य म्हणजे राज्यातील कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना त्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे उपलब्ध करून देणे. वाचक मित्रहो, आपण या पोस्टमध्ये MHADA lottery 2022 या शासनाच्या योजने संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत, म्हाडा संबंधित घर मिळविण्यासाठी लागणारी पात्रता, ऑनलाइन अर्ज कसा करावा, त्याचबरोबर नवीन अपडेट्स, त्यानंतर म्हाडा अंतर्गत नवीन सुरु झालेल्या योजना यांची माहिती. या योजने संबंधित माहिती मिळविण्यासाठी.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना मराठी 2023 इथे क्लिक करा

शेती करताना शेतकऱ्याला अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारभावात झालेली घसरण, सावकार किंवा बँकांकडून घेतलेले कर्ज, अशा अनेक आकस्मिक संकटांना सामोरे जावे लागते जसे की कर्ज परतफेडीचा कालावधी, निर्यातीतील सरकारी बदल, आणि हवामानातील अचानक बदलामुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. हजारो रुपये खर्च करून शेतकरी आपल्या शेतमालाची काळजी  घेतो. पण प्रत्येक वेळी त्याची मेहनत फळाला येत नाही. शेतकरी निसर्गावर अवलंबून असल्याने शाश्वत उत्पन्नाचा अचूक अंदाज लावणे कठीण असून हमी भावाचा प्रश्न सुद्धा आहेच. शेतकऱ्यांचे शेती संबंधित संपूर्ण समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने या योजनेची अंमलबजावणी सुरु केली. 

या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अल्प व मध्यम शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2022 साठी 4000/- कोटी रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेत राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांची लागवड करण्यावर भर दिला जाईल, आणि शेतकऱ्यांना हवामान बदलाचा सामना करण्यास मदत होईल. या योजने संबंधित माहिती मिळविण्यासाठी.

राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन 2023 इथे क्लिक करा

मुलांच्या आरोग्याचे रक्षण आणि सुधारणा करणे हे मूलभूत महत्वाचे आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये, आपण आरोग्य सुधारण्यात आणि बालमृत्यू कमी करण्यात नाट्यमय प्रगती पाहिली आहे. इतर उत्साहवर्धक आकडेवारीत, 2000 ते 2017 दरम्यान, 5 वर्षापूर्वी मरण पावलेल्या मुलांची संख्या निम्मी झाली आणि आज पूर्वीपेक्षा जास्त माता आणि मुले जिवंत आहेत. तथापि, मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी बरेच काम बाकी आहे. संपूर्ण जग या परिस्थितीचा सामना करत आहे. निम्म्याहून अधिक बालमृत्यू अशा परिस्थितींमुळे होतात ज्यांना सहज प्रतिबंध करता येतो किंवा सुधारित आरोग्य सेवा आणि जीवनाचा दर्जा याद्वारे सुधारणा करता येतात.

त्याच वेळी, मुलांना चांगले आरोग्य आणि पोषण, धोक्यांपासून संरक्षण आणि शिकण्याच्या आणि वाढण्याच्या संधींसह भरभराट होण्यासाठी एक स्थिर वातावरण प्रदान केले पाहिजे. एक चांगले भविष्य घडवण्यासाठी समाज करू शकणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांमध्ये गुंतवणूक करणे.

राज्यातील बालकांचे योग्य पोषण सुनिश्चित करण्यासाठी मिशन स्थापन करण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण अभियान 2005 साली स्थापन करण्यात आले. पहिला टप्पा पाच वर्षांचा होता. मिशनचा दुसरा टप्पा नोव्हेंबर 2011 मध्ये सुरू करण्यात आला होता. या योजने संबंधित माहिती मिळविण्यासाठी.

रेशीम उद्योग (पोकरा योजना अंतर्गत) 2023 इथे क्लिक करा

रेशीम उद्योग हा शेती आणि जंगलावर आधारित उद्योग आहे आणि त्यात प्रचंड रोजगार क्षमता आहे. प्रकल्पांतर्गत येणाऱ्या वनक्षेत्रात या उद्योगासाठी पोषक वातावरण असल्याने रेशीम उत्पादनास भरपूर वाव आहे. हा एक असा उद्योग आहे जो शेतीच्या वाढीसह ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत करतो. राज्यात, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून रेशीम उद्योगाला चालना मिळूनही राज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या उद्योगाकडे वळला नाही. हवामान बदलामुळे शेतकर्‍यांना परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून रेशीम उद्योगाला प्रचार आणि प्रोत्साहन देण्यासाठी या उद्योगाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हा समावेश करण्यात आला आहे. या योजने संबंधित माहिती मिळविण्यासाठी.

मधुमक्षिका पालन योजना 2023 महाराष्ट्र (पोकरा)  इथे क्लिक करा

मध, परागकण इत्यादी मिळवण्यासाठी मधमाश्या पाळल्या जातात, हा एक कृषी उद्योग आहे. मधमाश्या फुलांच्या रसाचे मधात रूपांतर करतात आणि पोळ्यात साठवतात. जंगलातून मध गोळा करण्याची परंपरा फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे जी आता लोप पावत आहे. बाजारात मध आणि त्याच्या उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे, मधमाशी पालन हा एक फायदेशीर आणि किफायतशीर व्यवसाय म्हणून आता प्रस्थापित झाला आहे. मध आणि मेण हे मधमाशी पालन उत्पादन म्हणून आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. मधमाशी पालन हा शेतीवर आधारित उपक्रम आहे, शेतकरी हा उद्योग करून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात. मधमाश्या फुलांच्या मकरंदाचे  मधात रूपांतर करतात आणि पोळ्यांमध्ये साठवतात. जंगलातून मध गोळा करण्याचा उद्योग फार पूर्वीपासून आहे. मधमाशीपालन उद्योग हा एक शाश्वत उद्योग म्हणून उदयास येत आहे, कारण मध आणि त्याच्या उत्पादनांची बाजारपेठेतील अत्यंत मागणी वाढत आहे. मध आणि मेण ही मधमाशीपालनातून मिळणारी दोन आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची उत्पादने आहेत. या योजने संबंधित माहिती मिळविण्यासाठी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 इथे क्लिक करा 

महाराष्ट्र सरकार नेहमीच राज्यातील जनेतेसाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवून त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती बळकट करण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असते, या योजनांच्या अंतर्गत विशेषत, समाजातील मागासवर्गीयांसाठी आणि तळागाळातील नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत, या धोरणाच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील मागासवर्गीय शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे, या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणार आहे, महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी हि योजना सुरु केली आहे, या योजनेच्या सहाय्याने सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. या योजने संबंधित माहिती मिळविण्यासाठी.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 मराठी  इथे क्लिक करा

भारत ही शेतीवर आधारित अर्थव्यवस्था आहे. लोकसंख्येचे विशेषतः ग्रामीण भागातील या क्षेत्रावरील अवलंबित्व प्रचंड आहे. हे क्षेत्र अनेक कृषी-आधारित उद्योगांसाठी कच्च्या मालाचे प्रमुख स्त्रोत आहे, आणि देश आणि त्याच्या संलग्न क्षेत्रांसाठी एक प्रमुख परकीय चलन कमावणार क्षेत्र आहे. कृषी क्षेत्रांचा परिणाम म्हणून राष्ट्रीय आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थेलवर गुणाकार प्रभाव पडतो. या सगळ्याच्या केंद्रस्थानी भारतीय शेतकऱ्याला कधीच शाश्वत ‘उत्पन्न सुरक्षा’ मिळाली नाही. हीच योग्य वेळ आहे की हस्तक्षेप आणि धोरणे आखली जावी ज्यामुळे शेतकरी हे साध्य करू शकतील, ज्याचा एकंदर निरोगीपणा, जोखीम घेण्याची गरज  आणि सर्वच बाबतीत उच्च उत्पादकता यावर कायमस्वरूपी परिणाम होईल. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचे औचित्य साधून ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा भारत सरकारचा पुढाकार हा एक स्वागतार्ह निर्देश आहे, ज्याचा उद्देश  शेती व्यवसायांमध्ये समग्र हस्तक्षेपांद्वारे भारतीय शेतकर्‍यांना फायदा करणे. या योजने संबंधित माहिती मिळविण्यासाठी.

बाल संगोपन योजना 2023 मराठी इथे क्लिक करा

बहुसंख्य समाजात मुलांचा मोठा वर्ग असतो आणि त्यांना देशाची सर्वात मौल्यवान संपत्ती मानली जाते. वंचित मुलांसाठी संरक्षण आणि विकास कार्यक्रम सर्व मुलांसाठी समान संधी प्रदान करणे आवश्यक आहे जेणेकरून इष्टतम वैयक्तिक विकास होईल. कुटुंबाची सामाजिक-आर्थिक परिस्थिती वारंवार कौटुंबिक निराशा, विखंडन आणि मुलाची निराधारता दर्शवते. संकटात असलेल्या कुटुंबांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, विशेष कार्यक्रम विकसित केले गेले आहेत. असुरक्षित मुलांच्या कल्याणाचा प्रचार करून, त्यांचे दुर्लक्ष, शोषण आणि अत्याचारापासून संरक्षण करून आणि वंचित मुलांना काळजी आणि आश्रय प्रदान करून, या विशेष सेवा पालकांच्या काळजी आणि पर्यवेक्षणाला पूरक किंवा बदलतात.

संस्थात्मक काळजी हा काही पर्यायांपैकी एक आहे, तरीही सर्वोत्तम संस्था देखील कुटुंब प्रदान करू शकणार्‍या वैयक्तिक काळजीचा पर्याय घेऊ शकत नाही. मुलांना दीर्घकाळ संस्थात्मक काळजीमध्ये ठेवण्याच्या पारंपारिक दृष्टिकोनामुळे मुले कौटुंबिक वातावरणापासून विभक्त झाली. संस्थात्मक काळजीची बहुविधता संकटात सापडलेल्या कुटुंबांसाठी त्यांच्या मुलाच्या संगोपनासाठी संस्थात्मकतेकडे एक पर्याय म्हणून पाहता, खर्च सुविधांपेक्षा कितीतरी जास्त आहे आणि सर्वोत्तम संस्था देखील कौटुंबिक काळजीची जागा घेऊ शकत नाहीत. त्यामुळे गैर-संस्थात्मक कौटुंबिक-आधारित सामुदायिक सेवा संकटात असलेल्या कुटुंबांना मदत केल्यास चांगले होईल जेणेकरून मुले त्यांच्या कुटुंबात वाढू शकतील. या योजने संबंधित माहिती मिळविण्यासाठी.

महाराष्ट्र सरकार राज्यातील जनतेसाठी तसेच राज्यातील उद्योग आणि व्यवसायांसाठी विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करत असते, या सर्व योजनांच्या माध्यमातून सरकार नागरिकांचे आणि त्याचबरोबर राज्यातील उद्योग व्यवसायांचे अनेक प्रकारच्या आर्थिक सुविधा देवून हित साधत असते. तसेच या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक मदत तसेच विविध प्रकारच्या आरोग्य सुविधा व जेष्ठ नागरिकांसाठी तसेच ग्रामीण महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि राज्यातील विद्यार्थी व लहान मुलांसाठी विविध योजना महाराष्ट्र सरकार राबवीत आहे, या योजनांचा पात्र नागरिकांनी अवश्य लाभ मिळवावा.